Monday, 18 May 2015

'अरुणा'स्त

 

42 वर्ष एक वेदना घेऊन ती जगत होती... जगत होती, किंवा कदाचित आला दिवस पुढे ढकलत होती. तिच्या संवेदना कोणीच शब्दात मांडू शकणार नाही. ती 'जगली' 24 वर्ष आणि 'मृत्युपंथावर' होती 42 वर्ष! अरुणाच्या जीवन-मृत्यूचा हा अजब खेळ 18 मे रोजी अरुणोदय झाला तेव्हा संपला.

गेली 42 वर्षांत आजूबाजूच्या जगात कितीतरी गोष्टी बदलत आहेत, पण तिच्या वर्षानुवर्षांच्या दिनक्रमात जरासाही फरक पडला नाही. नाही म्हणायला तिच्या तरुण शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्या. तिचे केस पांढरे झाले, सुरकुत्या आल्या. तिचा श्वास आणि ह्रदय सुरु होतं, मात्र तिच्यासाठी काळ 27 नोव्हेंबर 1973 च्या त्या रात्रीच थांबला.

कोण होती अरुणा?

कारवारमधल्या हल्दीपूर या छोट्याशा गावातून आलेली अरुणा मुंबईत येऊन जनसेवेसाठी नर्स झाली. केईएममध्ये नोकरी करत असताना तिथल्याच एका डॉक्टरशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांचं लग्नही ठरलं. पण तिथेच नोकरी करणार्‍या सोहनलाल वाल्मिकीनेही तिला लग्नासाठी विचारलं. तिने नकार दिल्याने त्याला राग आला.

काय झालं त्या रात्री ?

अरुणाने नकार दिल्याच्या खुनशीतूनच सोहनलालने तिच्या गळ्यात कुत्र्याची साखळी बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिच्या मानेतल्या नसा बंद झाल्या त्या कायमच्याच. तेव्हापासून तिची शक्ती, वाचा, दृष्टी, संवेदना सारं काही गेलं.

सोहनलालला पुण्यात अटक झाली, शिक्षाही झाली ती चोरी आणि खुनाच्या प्रयत्नासाठी. प्रत्येकी सात वर्षं आणि तीही एकत्र भोगायची. तो बाहेर आला आणि बदला घ्यायचा म्हणून केईएममध्ये दाखल असलेल्या तिच्या बेडची रेलिंगच काढून टाकली. खाली पडल्याने तिला जखमा झाल्या.

तिचा एकेकाळचा प्रियकर आणि भावी नवरा असलेल्या डॉक्टरने दुसरं लग्न केल होतं. तिच्या नातेवाईकांनीही तिला सोडलं होतं. तिच्यावर बलात्कार करुन तिला या अवस्थेत आणून सोडणार्‍या सोहनलालने आपली शिक्षा पूर्ण केली होती. दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये तो उजळ माथ्याने नोकरीही करत होता.

सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विराणी यांनी अरुणावर पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव 'अरुणाज स्टोरी'. हेच पुस्तक मराठीत अक्षर प्रकाशनाने 'अरुणाची गोष्ट' या नावाने आणलं. विनय आपटे यांनी 'कथा अरुणाची' हे नाटक रंगमंचावर आणलं.

ज्या केईएम रुग्णालयात माणुसकीशून्य सोहनलाल होता, त्याच ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या नर्स आणि डॉक्टर्सही होते. केईएमच्या मॅनेजमेंट, डॉक्टरांनी आणि सर्वांनीच तिला आपलं मानलं आहे. तिच्यावर एवढी वर्षं उपचार सुरु आहेत. पण त्यात उपकारांच्या भावनेचा लवलेशही नाही.

तिला दयामरण देण्याची मागणी झाली तेव्हा देशात वादळ उठलं. सुप्रीम कोर्टाने तिच्या दयामरणाचा प्रश्न निकाली काढला आणि केईएममधल्या नर्सनी जल्लोष साजरा केला.

अरुणाबरोबर काम करणार्‍या नर्सेस केव्हाच रिटायर झाल्या आहेत. पण नंतरच्या पिढीनेही तिचा प्रेमाने सांभाळ केला आहे. ती खोली गेली 42 वर्षं राखीव आहे.

अरुणा यांच्या मृत्यूने एका पर्वाचा अंत झाला. अरुणामुळे देशाला दयामरणाचा कायदा मिळाला. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रुपाने अरुणा तिचा सेवाभाव पुरवतच राहिली. ती गेली आणि सकाळीच 'अरुणा'स्त झाला.

Wednesday, 6 May 2015

आहार आणि आरोग्य


आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. आहार आणि आरोग्य यांविषयी लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व, घरच्या जेवणाची लज्जत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या यूथ आयकॉन ठरलेल्या दिवेकर यांनी पटवून सांगितली. 'जे आवडते तेच खा' असा मूलमंत्र देत चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. करिना कपूरसारख्या अभिनेत्रीपासून ते कॉर्पोरेट जगतातील उच्चपदस्थांपर्यंत अनेकांना सल्ला देणाऱ्या आणि विक्रमी खपाची तीन पुस्तके लिहिणाऱ्या दिवेकर यांच्यासोबतच्या संवादाने अनेकांच्या प्रश्नांचे निरसन झाले.

नियोजनबद्ध आहार कोणता?
आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

वाढलेली चरबी कशी कमी करावी?
आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.

कोणती फळे खावीत?
आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

मधुमेहासाठी आहार कसा असावा?
खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

शुगर-फ्रीचा वापर करावा का?
शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते. 

वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?
वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

कडधान्य कशी खावीत..
आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?
शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.

आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?
शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.
आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?
आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?
सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?
चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.

वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?
वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?
सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?
प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा.

तुमच्या कामाची सुरुवात कशी झाली?
मी काम साधारण १९९९ मध्ये काम सुरु केलं. त्यावेळी सामान्य माणसे फिटनेस तज्ज्ञांकडे वळत नसत. त्यावेळी लाली धवन आणि फराह यांना मी सर्वप्रथम मार्गदर्शन केलं. त्यानंतर २००३ सालापासून आपल्या अर्थव्यवस्थेत बदल झाला. अनेक लोक या शाखेकडे वळू लागले आणि मग माझं या क्षेत्रातलं नियमित काम सुरू झालं.

केस, त्वचेसाठी काय सल्ला द्याल?
केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

आपला दिवस कसा असतो?
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.
............

महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरात पतीने मदत केली, तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यास पत्नीला मदत होऊ शकते. नोकरी करून पुन्हा घरातील कामांचा डोंगर सांभाळताना महिलांची कसरत होते. त्यामुळे स्वयंपाकातील लहान कामांमध्ये मदत केल्यास कमी वेळात उत्तम स्वयंपाक तयार होण्यास निश्चित मदत होईल.

  • दर दोन तासांनी खा
  • फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा
  • नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा
  • जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या
  • जेवणानंतर एखादे फळ खा
  • संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात
  • रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या
  • हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.

‘From Where I See’ - A Book Review

Introduction:
Open any newspaper and all you see is strife, conflict and humans making life hell for other humans. Doesn’t the question ‘Why is this happening?’ creep into your mind on seeing this? Many people question the cause of all these problems but don’t really look for the answers. In his book ‘From Where I See’, author Dr. Ajay Yadav tries to delve beneath the surface and find answers to these situations that stem from the beliefs of men.

About the Author:
Dr. Ajay Yadav is a consultant anesthetist, intensivist and pain specialist. His textbook of anesthesia is the most sold textbook for medical undergraduates in India, Southeast Asia and Africa. He is a rational, logical and analytical thinker and is fond of reading, travelling and long distance running. It had always been his dream to write a book which can unfurl the other side of curtain.

Overview of the Book:
Ajay meets his childhood friend Shruti on a social network site. He finds her to be struggling with intrapersonal, interpersonal, inter-social and inter-religious conflicts. Eventually the conflicts kill her. Even if the police solve the case, will it prevent hundreds of Shrutis from getting killed?

How long will we think of ‘who’ killed as more important than ‘what’ killed a person? Till we don’t address this issue and work on it, many Shrutis will keep on getting killed. We need to cure the disease, not just the symptoms.

This book is an effort by the author to find the root cause and probable remedies of conflicts, and tries to explore hundreds of pertinent questions like “Why does it become so easy to get volunteers to blow up themselves and others for the sake of religion? Does religion divide or unite? What precipitates extramarital affairs? Is the immature and wrong interpretation of female emancipation the reason for a 13 fold rise in divorce rates in the last 5 years?

It’s not only a book, it’s the path to revolution, a journey towards an utopian world. Accepting the truth is the toughest job in the world. If you feel that you are open minded, have the courage to accept the truth and a desire to change the world. Be a part of the change and take the first step to build a road to the ideal world.


My Opinion on the Book:
This is one of the nice books that I have read in recent times because it raises a lot of questions in the mind of reader. And along with that it also gives a very good solutions for them.

The main highlight of this book is the concept of Uthopian World. I will give 5 stars for the concept of Uthopian word and recommend this book to those readers who like to read about the utopian world.

However in some parts the book are very lengthy and the reader tends to become bore. The author could have cut down somewhere and made it more crisp.
Other Details:
Publisher            : LiFi Publications Pvt Ltd
Author                :  Ajay Yadav
Edition                : 1
No of pages        : 403 pages
Publication Year  : February 1, 2015
Language            : English
Binding                : Paperback

This review is a part of the biggest Book Review Program for Indian Bloggers. Participate now to get free books!

Monday, 20 April 2015

पदर

"पदर‘! काय जादुई शब्द आहे हो मराठीतला! काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन अक्षरी शब्द. पण, केवढं विश्‍व सामावलेलं आहे त्यात! किती अर्थ, किती महत्त्व... काय आहे हा पदर? साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणारा मीटर-दीड मीटर लांबीचा भाग. तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण, आणखीही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा!

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा, कसा अन्‌ कशासाठी करेल, ते सांगताच येत नाही. सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान पदरांची जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या जणींमध्ये चर्चाही तीच. लहान मूल आणि आईचा पदर, हे अजब नातं आहे. मूल तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन "अमृत‘ प्राशन करण्याचा हक्क बजावतं. जरा मोठं झालं, वरण-भात खाऊ लागलं, की त्याचं तोंड पुसायला आई पटकन तिचा पदरच पुढं करते. मूल अजून मोठं झालं, शाळेत जाऊ लागलं, की रस्त्यानं चालताना आईच्या पदराचाच आधार लागतो. एवढंच काय, जेवण झाल्यावर हात धुतला, की टॉवेलऐवजी आईचा पदरच शोधतं आणि आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. मुलानं पदराला नाक जरी पुसलं, तरी ती रागावत नाही त्याला... बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो. "छोटा भाई‘मधलं ते गाणं आठवतं का तुम्हाला? "मॉं मुझे अपनी आँचल में छुपा ले, गले से लगा ले, के और मेरा कोई नहीं!‘ भारतातल्या प्रत्येक प्रांतातल्या पदर घेण्याच्या पद्धती निराळ्या. कुठं डोक्‍यावरून पदर घेतात, कुठं डोक्‍यावरून घेऊन चेहराही झाकला जातो, काही ठिकाणी दोन्ही खांद्यांवरून, तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. महाराष्ट्रात तो डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो; तर गुजरात, मध्य प्रदेशात उजव्या खांद्यावरून पुढं मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलतो! काही कुटुंबात मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानं चेहरा झाकून घेतात, तर काही जणी आपला लटका, राग दर्शवण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात!

ओटी भरायची ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं वाण लुटायचं ते पदर लावूनच. बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदरच डोक्‍यावर ओढला जातो, तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब मिळते! काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदरालाच गाठ बांधली जाते अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची गाठ ही नवरीच्या पदरालाच (नवरदेवाच्या उपरण्यासोबत) बांधली जाते.

"पदर‘ हा शब्द किती अर्थांनी वापरला जातो ना? मुलगी वयात आली, की तिला "पदर आला‘ असं म्हटलं जातं. देवापुढं मागणं मागताना हाच पदर पसरला जातो. नवी नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळे करते, पण कामाचा धबडगा दिसला, की पदर खोचून कामाला लागते. देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या चुका "पदरात घे.‘ मुलगी मोठी झाली, की आई तिला साडी नेसायला शिकवते, पदर सावरायला शिकवते अन्‌ काय म्हणते - अगं, चालताना तू पडलीस तरी चालेल. पण, "पदर‘ पडू देऊ नकोस! अशी आपली संस्कृती. या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत. "पदर सुटला‘ म्हटले, की फजिती झाली; कुणी पदर ओढला म्हटलं, की छेड काढली. कित्येक कवींनी, लेखकांनी याचा उपयोग केला आहे, अगदी अभंगापासून लावणीपर्यंत!

"पदरावरती जरतारीचा गोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात. असा हा किमयागार पदर काही वेळेस घातही करू शकतो बरं का! लोंबकळणारा लांब पदर गाडीच्या चाकात अडकून पाडू शकतो... स्टोव्ह, गॅसपाशी पेटून जिवाशी खेळूही शकतो. तेव्हा मैत्रिणींनो, जरा जपून, पदर सावरा...

Friday, 17 April 2015

आजीचे अनुभवी सल्ले

१.साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.

२.सूखे खोबरे तूरडाऴित खुपसून ठेवले तर ख़राब होत नाही.

३.रस्सा भाज्या खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारट पणा कमी होतो.

४.लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.

५.कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.

६.बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी.

७.हिंगाचा वास टिकवीण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.

८.डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा.

९.दुधाला वीरजण लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी.दही घट्ट होते.

१०.भाज्यांमध्हे मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकन्यास मदत होते.

११.भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घातले तर ती चिकट होत नाही.

१२.पुरयांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुरया बराच वेळ फुगलेल्या राहतात.

१३.छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभरा डाळही भिजवावी, त्याने छोले छान रस्सादार आणि दाट होतात.

१४.कट्ट्यावर लिम्बाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.

१५.कढ़ीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढ़ीलिम्बाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात.

१६.गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.

१७.कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता ठंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी २ दिवसांत एकदा बदलावे.

१८.पालेभाज्या शिळय़ा सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिम्बुरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.

१९.शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात २ चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोड़े परतावे. त्याने साल लवकर सुटतात.

२०.पकोड़े चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे.

२१.शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.

२२.भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.

२३.खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.

२४.एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.

२५.मिठाला पावसाळयात पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.

२६.पुदीना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो.

२७.पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोड़े लिम्बू पीळावे.

२८.शिळा ब्रेड कड़क उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.

२९.फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.

३०.रोज विशिष्ट भांड्यात आपण चाहा करतो. त्यास चहाचे डाग पडतात. ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.

३१.पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.

३२.हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे आणि हात धुतल्यानंतर वास जातो.

३३.ताक आम्बट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद

काढून टाकावे. आम्बटपणा कमी होईल.

३४.ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.

३५.ड्राई फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी १ तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.

३६.कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.

३७.कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात १ चिमटी मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.

३८.भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.

३९.पावसाळयात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा.

४०.दोस्याच पीठ हिवाळयात आम्बवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मधे पीठ ग्राइंड करताना घालावे.

४१.लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची साल लवकर सुटते.

४२.हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत.

४३.कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावा.

४४.लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पैन मधे कढवा. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते.

४५.लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजि दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.

४६.वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोडा भिजवून मिल्क पावडर व पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.

४७.करंजी, शंकरपाळ, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव। पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.

४८.अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोड़ी तांदळlची पीठी मिसळlवी.

४९.अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोड़ी साखर घालून त्यावर अनारसा थापावा.

५०.घरात किंवा स्वैपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.

५१.घराच्या कोपरया मध्ये बोरिक पावडर टाकून कॉक्रोचेस ला पळवता येइल.

५२.मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईण्ड कराव.

५३.कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.

Monday, 13 April 2015

30 मिनीट चालण्याचे ३० फायदे

नित्यनियमाप्रमाणे दररोज न चुकता क्षितीजावर सुर्योदय होतो, सुर्योदयाचे ते रम्य दृष्य, घरट्यातून बाहेर पडणारया पक्षांचा किलबिलाट, थंड, मोकळी, प्रदुषण विरहीत हवा यांचा अनुभव घेण्यासाठी सकाळी लवकर ऊठायलाच हवे.
पण या सुर्योदयाच्या वेळेस आपणास दोन प्रकारचे लोक भेटतात, एक मस्त पैकी पांघरुणात झोपलेले व आपापल्या कामाच्या लगबगीत असणारे लोक. जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असचाल तर प्रथम आपले अभिनंदन, कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.
दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन संतुलित ठेवण्याचा चालणे हा उत्तम मार्ग आहे
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!

Monday, 23 February 2015

A Short Story

Once Buddha was traveling with a few of his followers. While they were passing a lake, Buddha told one of his disciples, "I am thirsty. Do get me some water from the lake."

The disciple walked up to the lake.

At that moment, a bullock cart started crossing through the lake.As a result, the water became very muddy and turbid. The disciple thought, "How can I give this muddy water to Buddha to drink?" So he came back and told Buddha, "The water in there is very muddy. I don't think it is fit to drink." 

After about half an hour, again Buddha asked the same disciple to go back to the lake.
The disciple went back, and found that the water was still muddy. He returned and informed Buddha about the same.

After sometime, again Buddha asked the same disciple to go back. This time, the disciple found the mud had settled down, and the water was clean and clear. So he collected some water in a pot and brought it to Buddha. Buddha looked at the water, and then he looked up at the disciple and said, " See what you did to make the water clean. You let it be, and the mud settled down on its own, and you have clear water."

Your mind is like that too ! When it is disturbed, just let it be. Give it a little time. It will settle down on its own. You don't have to put in any effort to calm it down. It will happen. It is effortless." Having 'Peace of Mind' is not a strenuous job, it is an effortless processs keep ur mind cool and have a grt life ahead...

Never leave Your close ones.
If you find few faults in them just close Your eyes and remember  the best time You spent together because Affection is More Important than Perfection..